Tuesday, May 17, 2011




















आताशा मी कोणाशीच attach होत नाही..
कोणाशीच wavelength माझी match होत नाही..
कोणी हसून बोललं तर मीही तोंडभर हसतो..
बोलायलाच पाहिजेत म्हणून 2 वाक्य बोलतो..
innocent प्रेमाची आता भीतीच वाटते जरा,
मैत्री बित्री प्रकार फक्त facebook वरच बरा
विचारलाच कुणी तर म्हणायचं "I am fine"
नकोच वाटल बोलायला तर जायचं offline.
मन आता घेत नाही कोणाकडे धाव..
राहत फक्त कुरवाळत चिघळलेले घाव.
संपलेत मित्र राहिलीयत फक्त professional नाती,
सांभाळायची just weekend मजेत घालवण्यासाठी..
मन झालाय प्लास्टिक आता होत नाही ओलं
कळलंच नाही कधी आपल्याच कोशामध्ये गेल?
मित्रांचेही फोन आता सोयीनुसार घेतो..
पत्ता विचारलाच कोणी तर ...... facebook id देतो!

2 comments:

जय घोलप said...

Mast aahe....

Shardul said...

Awesome...

tuzya sagalyach post mast aahet...

Keep it up....

Cheers